समाजसेवक प्रकाश ताकसांडे यांचा ‘क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सेवाव्रती पुरस्कार’ देऊन गौरव * अरविंद कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने सन्मान * अरविंद कात्रटवार यांच्या वतीने ५०० माताभगीनींना वस्त्रभेट
* प्रकाश ताकसांडे यांचे निस्वार्थ भावनेने केलेले सेवाभावरूपी कार्य प्रेरणादायी :- कात्रटवार यांचे प्रतिपादन

AVB NEWSगडचिरोली :-
गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त, अविकसीत आदिवासीबहुल जिल्हयात जेष्ठ समाजसेवक प्रकाश ताकसांडे यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात निस्वार्थ भावनेने केलेले सेवाभावरूपी कार्य प्रेरणादायी आहे, जनसेवेला वाहून घेतलेल्या ताकसांडे यांच्यासारख्या समाजसेवकाची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन मौशिखांब मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंद कात्रटवार यांनी केले.
महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीची मशाल प्रज्वलीत करणारे का्रंतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अरविंदभाऊ कात्रटवार व मित्रपरिवाराच्या वतीने जेष्ठ समाजसवेक प्रकाश ताकसांडे यांचा ‘क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सेवाव्रती पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी अरविंद कात्रटवार यांनी मनोगत व्यक्त करीत ताकसांडे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की, जेष्ठ समाजसेवक प्रकाश ताकसांडे हे उच्च शिक्षीत व अभ्यासू व्यक्तीमत्व असून त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजकार्यासाठी केला. पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरोधात वाचा फोडून गोगरीबांना न्याय मिळवून दिला. राजकीय क्षेत्रात वावरत असतांना सुध्दा त्यांनी जनतेसाठी निस्वार्थ भावनेने कार्य केले. जिल्हयातील अनेक ज्वलंत समस्या त्यांनी शासनदरबारी पोहचवून शासनाचे गडचिरोली जिल्हयाच्या विकासाकडे लक्ष वेधले. जनकल्याण हेच ध्येय ठरवून प्रकाश ताकसांडे यांची वाटचाल सुरू आहे, असेही अरविंद कात्रटवार म्हणाले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार हिरामन वरखडे यांनी प्रकाश ताकसांडे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ताकसांडे यांनी समाजकारणावर अधिक भर देत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम केले.ताकसांडे यांच्या सारख्या व्यक्तीमत्वाची समाजाला गरज असून त्यांच्या हातून समाजसेवेचे कार्य सदैव घडत राहो, अशी भावना व्यक्त केली.
सत्कारमुर्ती जेष्ठ समाजसेवक प्रकाशजी ताकसांडे म्हणाले की, अरविंद कात्रटवार व मित्रपरिवाराच्या वतीने ‘‘क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सेवाव्रती पुरस्कार’ देऊन करण्यात आलेला सन्मान हा माझ्या कार्याला उर्जा देणारा आणि समाजकार्याप्रती मनोबल वाढविणारा आहे. फळाची अपेक्षा न ठेवता एक जागृक नागरिक म्हणून निस्वार्थ भावनेने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या कार्याची पावती म्हणजे अरविंद कात्रटवार व मित्रपरिवाराच्या वतीने ‘‘क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सेवाव्रती पुरस्कार’ देऊन केलेला सन्मान आहे, असे प्रकाशजी ताकसांडे म्हणाले.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे आणि समता, न्याय, बंधुता आणि सत्यासाठी झटणारे आणि महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीची मशाल प्रज्वलीत करणारे थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची जयंती अरविंद कात्रटवार मित्रपरिवाराच्या वतीने मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रात उत्साहात साजरी करण्यात आली. या क्षेत्रातील लोकनेते अरविंदकात्रटवार यांच्या वतीने ५०० माताभगिनींना वस्त्रभेट देऊ न नारिशक्तीचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, सुरेश कोलते, दिलीप वलादी, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते