जिल्हा

लोकप्रतिनिधींना जे जमले नाही, ते कात्रटवार यांनी करून दाखविले !   * अखेर मोहटोला -निमगावला जोडणारा ‘सेतू’ झाला पुर्ण.  * शिवसेना (उबाठा) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांच्या आंदोलनाची फलश्रृती

 

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- सत्ता असो की नसो लोकशाही मार्गाने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून विकासासाठी धडपड केल्यास केल्यास कोणतीही समस्या दूर होऊ शकते, हे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांनी दाखवून दिले आहे. जे लोकप्रतिनिधींना करता आले नाही ते मोहटोला – निमगाव रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यास प्रशासनास भाग पाडले. त्यामुळे या मार्गावरील पुलाचे बांधकाम पुर्णत्वास आले असून या भागातील वाहतूकीची समस्या दूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मोहटोला – निमगाव मार्गावर ३० वर्षापुर्वी रेज कॉजवचे बांधकाम करण्यात आले होते. हा मार्ग गडचिरोली, आरमोरी व धानोरा येथे ये-जा करण्यासाठी सोयीस्कर असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या मार्गाने शाळेकरी विद्यार्थी मार्गक्रमण करतात. या रेज कॉजवेची वॉल कोसळल्याने पुल कोसळून मोठी अपघाताची घटना घडण्याची स्थिती निर्माण झाली होती. या पुलावरून मार्गक्रमण करणे धोकादायक झाले होते. सदर गंभिर बाब लक्षात घेऊन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या शेकडो शिवसैनिकांसह बांधकाम विभागाच्या कार्यालयवर धडक देत मोहटोला – निमगाव रस्त्यावर नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी रेटून धरली होती.

अरविंद कात्रटवार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते की, मोहटोला – निमगाव मार्गावरील नाला पावसाळ्यात तुडूंब भरून वाहतो. तसचे पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाण्याच्या दाबामुळे नाल्यावरील पुल केव्हाही कोसळू शकतो. पावसाळ्यात या पुलावरून पाच ते सहा फुट पाणी वाहते. त्यामुळे निमगाव येथे शिक्षण घेणारे शाळेकरी विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहतात. तसेच या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. नाल्यारील जुना पुल कोसळून मोठी दुर्घना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब अरविंदभाऊ कात्रटवार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन मोहटोला – निमगाव रस्त्यावर पुलाचे बांधकाम मंजूर करून ते पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील वाहनधारक, शाळेकरी विद्यार्थी व नागरिकांची समस्या दूर झाली आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद कात्रटवार यांनी नवीन पुलाचे बांधकाम मार्गी लावल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अरविंद  कात्रटवार यांनी नुकतेच नवीन पुल बांधकामाला भेट देऊन आपल्या शेकडो शिवसैनिकांसह जल्लोष साजरा केला.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, प्रमोद आवारी, मंगल भरणे, संदिप हर्षे, तुषार बोरकर, निखील आवारी, प्रविण आवारी, दिपक कोसमशिले, रोशन आवारी, आदित्य भरणे, अजिंक्य नगराळे, साहिल कोसमशिले, राहुल सावरकर, विलास ढोलणे, मनोज मांडवकर, विनोद जांभुळकर, अमोल भैसारे, प्रकाश भैसारे, आनंदराव सोरते, लोमेश कुमरे, रामदास ठाकरे, उमेश चापले, पराग कुमरे, सौरभ कोलते, मोहित लाजुरकर, अमिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, गुणेश गुंटीवार, युजिन चौधरी, आरिफ ढवळे, रोशन कारेते, प्रेमानंद जनबंधु, साहिल कारेते, नयन कारेते, तन्मय झंझाळ, मधुकर बावणे, सचिन मडावी, पियुष सेलोटे, रंजित वलादे, अजय सेलोटे, देवेंद्र वलादे, आशिष शेडमाके, प्रकाश भजभुजे, अजीत समर्थ, अजय राऊत, तेजस समर्थ, विशाल बोरकर, साहिल बांबोळे, प्रज्वल बोरकर, सुमित डोंगरे, राजेंद्र मेश्राम, धनराज टेंगे, मयुर मेश्राम, नवनाथ नरुले, आकाश कोडवते, जीवन उसेंडी, गणेश ठाकरे, मोरेश्वर वलादे, आशिष मुरतेली, अभिषेक करकाडे, विलास नैताम, स्वप्निल जुमनाके, विलास उंदिरवाडे, रमेश ढवळे, पुरुषोत्तम उंदिरवाडे, विलास भैसारे आदि शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.